आजही काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशाारा देण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) तसंच हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे
सिंधूदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. इथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे
हवामान विभागाने या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.
तर, राज्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा उशारा देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि अकोला या जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. किंवा दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं शक्यतो टाळावं.
पुढच्या 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी सकाळच्या वेळेत आकाश अंशत: निरभ्र राहील, तसंच शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मुंबईतलं कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 डिग्री आणि 29 डिग्रीच्या आसपास असेल.
टिप्पणी पोस्ट करा