राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढायचे झाल्यास पाण्याची उपलब्धता असणे गरजेचे आहे, परंतु प्रत्येक शेतकरी स्वतःच्या पैशाने विहीर खोदू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये राज्यात मागेल त्याला विहीर योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे अनुदान देण्यात येते.
अनेक शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता नसल्याने रब्बी हंगामातील तसेच उन्हाळी पिके घेता येत नाही अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते, शेतीत पाणी उपलब्ध असल्याने उत्पादनात भर पडते. व त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढवण्यास मदत होते.
महाराष्ट्र शासन रोजगार निर्मिती अंतर्गत शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला विहीर योजना राबविण्यात येते या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अनेक पद्धतीने अर्ज करावा लागेल अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे.
मागेल त्याला विहीर योजना अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ ओपन करावे
त्यानंतर विहीर अर्ज हे ऑप्शन निवडा, त्यानंतर आपले गाव स्वतःचे नाव, ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, जात प्रवर्ग अशा प्रकारची संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरा.
आठ अ प्रमाणे जमिनीची माहिती भरा. किती आहे हे टाका. त्यानंतर प्रपत्र ब असेल त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल तो टीपी बॉक्स मध्ये टाका.
तुमचा अर्ज सक्सेसफुल झालेला आहे अशा प्रकारचा मेसेज तुमच्या मोबाईल क्रमांक वर पाठवण्यात येईल व अशाप्रकारे मागेल त्याला विहीर योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
टिप्पणी पोस्ट करा