Smart Meter Maharashtra : एप्रिल पासून स्मार्ट मीटर लागणार आहे. आणि या स्मार्ट मीटरला तुमच्या मोबाईल प्रमाणे रिचार्ज करावा लागणार आहेत.
रिचार्ज संपलं तर तुमचे जे वीज आहे हे कनेक्शन किंवा विविध बंद पडणार आहे. नेमकी या संदर्भात काय अपडेट आहे ? हे आज जाणून घेऊया.
तुमचे स्मार्ट मीटर ला मोबाईल प्रमाणे रिचार्ज केल्यानंतर जर रिचार्ज संपलं तर तुम्हाला काय करता येतं ? किंवा काय प्रकिया आहे हे थोडक्यात पाहूया.
Smart Meter Maharashtra
तुम्हाला माहीतच आहे की महावितरण प्रशासनाकडून स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसवण्याची गती वाढविली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र तथा ऊर्जामंत्री फडणवीस यांनी या संदर्भात सूचना दिल्या आहेत.
ग्रहांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रण ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार अधिकार देणार आहेत. जेवढी वीज तुम्हाला लागेल किंवा वीज वापरण्यात येणार आहे तेवढेच तुम्हाला रिचार्ज केले जाते.
त्या ठिकाणी करता येणार आहे, आणि रिचार्ज संपलं तर तुम्ही ते रिचार्ज लगेच करू शकणार आहात. अशा पद्धतीचे हे स्मार्ट मीटर असणार आहे.
स्मार्ट मीटर चे काही खास वैशिष्ट्ये आहेत, हे देखील महत्त्वाचं आहे. या स्मार्ट मीटर चे काय खास वैशिष्ट्ये आहेत हे खाली तुम्हाला दिलेले आहेत.
स्मार्ट मीटरची वैशिष्ट्ये
वीजग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत देण्यात येईल. विजेसाठी आवश्यक तेवढी रक्कम भरून वीज वापरता येईल.
वीज वापरावर किती खर्च करायचा, किती वीज वापरायची याचे नियोजन करणे ग्राहकांना शक्य होईल.
विजेचा अनावश्यक वापर टाळून आर्थिक बचत करता येईल. मोबाईलप्रमाणेच रिचार्ज करण्याची सुविधा ग्राहकांना घरबसल्या ऑनलाइनद्वारे उपलब्ध होईल.
रिचार्ज केलेल्या रकमेतून दररोज वीज किती वापरली, रक्कम किती शिल्लक आहे व रिचार्ज संपत आल्याची माहिती मोबाईलद्वारे मिळत राहील. त्यानुसार आर्थिक नियोजन करणे शक्य होईल.
रिचार्जची रक्कम सायंकाळी सहा ते सकाळी 10 वाजेपर्यंत संपली, तरी वीजपुरवठा सुरु राहील. मात्र ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत रिचार्ज करावा लागेल. त्यावेळी रिचार्ज संपल्यावर वापरलेल्या वीजेची रक्कम कपात होईल.
टिप्पणी पोस्ट करा